जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कानळदा येथील शेत शिवारात बिबट्याने वासरू तर दाेनगाव येथे गाईवर हल्ला करून ठार केले आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून कानळदा परिसरात बिबट्याचा वावर आहे. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहे. बिबट्याच्या शाेधासाठी त्या भागात दाेन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती एरंडाेल येथील आरएफओ डी.एच.लाेंढे यांनी दिली.
बिबट्याची दहशत वाढली
धरणगाव तालुक्यातील दाेनगाव शिवारात शुक्रवारी दादाराम सोनू सपकाळे यांच्या शेतात गाईवर हल्ला करुन ठार केले. घटनास्थळी बिबट्याचे पायाचे ठसे आढळून आली आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव संरक्षण संस्थेचे दिनेश सपकाळे, रितेश भोई, योगेश गालफाडे, दत्तात्रय लोंढे व कर्मचाऱ्यांनी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
यावेळी वन विभागाचे वनपाल ठाकरे यांनी पंचनामा करून संबंधित पशू मालकास नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन करुन सावधानता बाळगण्याच्या सूचना दिल्या.