जळगाव (प्रतिनिधी) । केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यात विविध संघटना,शेतकरी, राजकीय पक्ष संताप व्यक्त करीत असून विरोध करीत आहे. दरम्यान, जळगावातही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेतर्फे केंद्र सरकारचा निषेध करून आंदोलन करण्यात आले.
केंद्राकडून शेतकऱ्यांची अवहेलना ; गुलाबराव वाघ
कोरोनाच्या महामारीत देशांत आर्थिक संकट ओढवले आहे. यात केंद्र सरकाने कांदा निर्यात बंदी केल्याने कांद्याचा भाव गडगडलेला आहे. कोरोना संकट काळात शेतकऱ्यांना मदत न देता कांदा निर्यात बंदी करून केंद्राने शेतकऱ्यांची अवहेलना केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमख गुलाबराव वाघ यांनी करत कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी अशी मागणी केली. पंतप्रधानांचा आज वाढदिवस असून आज शेतकरी पंतप्रधान मोदी यांचा निषेध करीत असल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेना महागराध्यक्ष शरद तायडे, राजेंद्र चव्हाण, नितीन सपके, विजय बांदल,जाकीर पठाण, इकबाल शेख, रइस शेख, हेमंत महाजन, प्रकाश पाटील, देवीदास पवार, ओगल पांचाळ, मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरडकर, योगेश सपकाळे, इश्वर राजपूत, जितू साळुंके, शंतून वानखेडे, जनार्दन सपकाळे आदींची यावेळी उपस्थिती होती.