कळमडू येथील शेतकऱ्याची लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

0

चाळीसगाव प्रतिनिधी – तालुक्यातील कळमडू येथील शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 7 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अंकुश विक्रम पाटील (वय 35) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.याबाबत मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी कळमडू तालुका चाळीसगाव येथील शेतकरी अंकुश विक्रम पाटील वय 35 यांचा मृतदेह दिनांक 7 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला आहे याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.