ज्ञानेश्वर राजपूत
लोहारा ता.पाचोरा;- येथील एका तरुणाने कळपातून भरकटलेल्या एका नवशिशु हरणाच्या पाडसाचा जीव वाचवून त्याला वनविभागाच्या ताब्यात दिल्याने सादर तरुणाचे कौतुक परिसरात होत आहे .
लोहारा-एकुलती मार्गावर चिंध्या देव ते दुध्या नाला या नावाने पूर्वीपासून शेतपरिसर ओळखला जातो शेतांच्या आजूबाजूला घनदाट झाडी व जंगली वेलांच्या मोठमोठ्या जाळ्या होत्या हरणासारखे वन्यप्राणी लपण्यासाठी त्यांचा सहारा घेत वन्यप्राण्यांचा कायदा कडक होण्याअगोदर पासून काही हरणांचे वास्तव्य ईकडे होते याची जाणीव शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे असतांना जाणून-बुजून कुणी त्यांची शिकार केली नाही व करूही दिली नाही ते आता कळपात रूपांतर झाले आहे . या हरणांचा बांधावर असलेल्या झाडाझुडपांचे कटाई झाल्याने आता मुक्त संचार दिसतो या परिसराच्या कळपातीलच हे नवजात शिशु असावे अवघ्या दोन-तीन दिवसापूर्वी जन्मलेले हरणाचे मादी जातीचे पिल्लू धडपडत त्याला चालता येत नव्हते . लोहाराहुन एकुलती गावाकडे जाणारे अशोक किसन लिंगायत यांच्या दुचाकी समोर आले. त्याला धड चालता येत नव्हते यामुळे एक तर याची शिकार होऊन जाईल किंवा नैसर्गिक तापलेल्या वातावरणाने त्याचा शेवट होईल अशा परिस्थितीत हे पिल्लू अशोक लिंगायत यांनी अलगद उचलले व घरी न आणता अगोदर पोलिसांना दाखवले . त्याला घरी आणून गायीचे दूध,पाणी पाजून रात्रभर त्याचा सांभाळ केला . दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक गर्दी पाहून लोकशाहीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजपूत हे तिथे गेले व भ्रमणध्वनीवर वनविभागाचे वनपाल एस.टी.भिलावे यांना माहिती दिली . वनपाल यांनी हे नवजात हरणाची मादी शिशु ताब्यात घेतले असून निगराणीत ठेवून त्यास सशक्त करून वनविभाग किंवा ज्या परिसरातून आणले त्या परिसरात कळपाचा संचार पाहून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात येणार आहे. वन्यप्राणी हरणाचे पिल्लू असल्याने अनेक ग्रामस्थांनी आसक्तीने कुतूहलाने पाहण्याचा आनंद लुटला.
——आंबेवडगाव परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करा ; महिला सरपंचांची मागणी——
:- तालुक्यात गंभीर पाणीटंचाईचे संकट त्यातच सूर्य आग ओकत आहे वनविभागात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही . यामुळे ते नागरी वस्तीकडे धाव घेऊन शिकार होतात किंवा तडफडून मरतात अशा घटना घडत आहेत. आंबेवडगाव परिसराला लागूनच कोकडी शिवारात पाचशे हेक्टर च्या जवळपास राखीव जंगल आहे . या जंगलात नीलगाय,हरीण,रानडुक्कर,ससे,लांडगे,मोर,कोल्हे आदी प्रकारचे वन्यप्राणी आहेत . त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने कृत्रिम पाणवठे तयार करावे अशी मागणी आंबे वडगाव तालुका पाचोरा येथील महिला सरपंच कलाबाई पाटील यांनी लेखी पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे मागणी केली आहे .