Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»औरंगाबादच्या नामांतरावर मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले….
    ताज्या बातम्या

    औरंगाबादच्या नामांतरावर मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले….

    By January 8, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं या मुद्द्यावरून सध्या महाराष्ट्राच राजकारण चांगलच तापलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन भाजपकडून महाविकास आघाडीवर टीका केली जात आहे. पण, महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून याला विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबादच्या नामकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. दरम्यान, यावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, ही पूर्वीपासून बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ही काय शिवसेनेची आजची घोषणा नाही. संभाजीनगर नाव देणे काही चुकीचे नाही. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील सांगितले आहे, असे ते म्हणाले.

    औरंगाबाद शहराच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः औरंगाबाद शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ झाले पाहिजे, अशी इच्छा व्यक्त केली होती. आजपर्यंत एकाही शिवसैनिकाच्या मुखातून या शहराचा उल्लेख औरंगाबाद असा येत नाही. तो संभाजीनगर असाच येतो. याप्रश्नी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून तोडगा काढतील, अशी भूमिका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मांडली.

    फडणवीसांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये –

    गुलाबराव पाटील यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शिवसेनेवरील टीकेचा समाचार घेतला. ‘हिंदुत्त्व कुणाचे बदलले आहे, हे कोणाच्या सांगण्यावरून ठरत नाही. शिवसेनेचा जन्म हा हिंदुत्त्वापासून झाला आहे. शिवसेना जेव्हा राज्यात आली तेव्हा ती मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आली. त्यामुळे फडणवीसांनी आम्हाला हिंदुत्त्व शिकवू नये. शिवसेनेच्या स्थापनेनंतर विलेपार्लेमधून जे आमदार निवडून आले, त्यांची निवडणूक फक्त हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर रद्द झाली होती, हे फडणवीसांनी विसरू नये’, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी फडणवीसांना लगावला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif