एसटी महामंडळ आणि संघटनांमध्ये निघाला नाही तोडगा

0

बैठक निष्फळ ; संप चिघळण्याची शक्यता प्रवाशांचे हाल सुरूच
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी 8 तारखेच्या मध्यरात्रीपासून अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. दरम्यान, एसटी महामंडळाचे व्यवस्थापक आणि कर्मचारी संघटनांमधली बैठक निष्फळ ठरली आहे. बैठकीत संपाबाबत कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे संप चिघळण्याची शक्यता असून मात्र प्रवाशांचे मात्र हाल होत आहे .

कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि दिवाकर रावते यांच्यात बैठक झाली. त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे हा संप आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे. दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणच्या बस डेपोमधून गाड्याच बाहेर निघाल्या नाहीत.

पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे. अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. अचानक काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसटी प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

राज्यभरात शेकडो कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. एकट्या बीड जिल्ह्यात 121 जणांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यातआले . तर यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 9 आगारातील 46 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नाशिक आगारातील काही जणांचं निलंबन मागेही घेण्यात आलं. पण मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनं झाली तरी संप सुरुच ठेऊ, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, शिवशाही बस आणि शिवसेना प्रणित वाहतूक संघटनेकडून मात्र वाहतूक सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.