Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»एलआयसी कॉलनी परिसरात चिखलाचे साम्राज्य
    जळगाव

    एलआयसी कॉलनी परिसरात चिखलाचे साम्राज्य

    By September 4, 2020No Comments11 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : तालुक्यात 114 टक्के पाऊस पडल्याने काही भागात जमिनीत पाणी सिंचन होत नसल्याने एल आय सी कॉलनी परिसरात गल्ल्यांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना येण्याजाण्यास त्रास होत आहे.

    आठ दिवसांपूर्वी सतत पाऊस पडल्याने एल आय सी कॉलनी परिसरात गल्ल्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी साचले या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी नाहीत आणि अति पाऊस झाल्याने पाणी देखील जमिनीत जिरत नाही रिकामे पडलेले प्लॉट खोलगट भागात आहेत. त्यामुळे डबके साचले आहेत. मुख्य रस्ता गल्लीतील रस्त्यांपेक्षा उंच असल्याने साचलेले पाणी वाहून जात नाही परिणामी नागरिकाना पाण्यातूनच ये जा करावे लागत आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती देखील वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.  मलेरिया, तापाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    पालिकेने पाण्याचा निचरा करावा आणि डबक्यांमध्ये तसेच पाणी साचलेल्या ठिकाणी मुरूम टाकण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे त्याच प्रमाणे रस्त्यांच्या कडेला , खुल्या भूखंडात गाजर गवत ,झुडुपे वाढली आहेत गाजर गवताने नागरिकांना ऍलर्जी चा त्रास होतो म्हणून साफसफाई करून कीटक नाशक फवारणी करण्याचीही मागणी नागरिकांनी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif