भुसावळ :- मध्य रेल्वेच्या वतीने विभागातून धावणार्या एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांची गती वाढविण्यात अली आहे. त्यामुळे काही एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

यात २९ एक्सप्रेस गाड्या ३ ते २० मिनिटे, १० एक्सप्रेस १० ते ३० मिनिटे तर पॅसेंजर गाड्या ५ तेे ३५ मिनिट अधिक वेगाने धावणार आहे. हा बदल दि. १ जुलै पासून लागू असणार आहे. यामुळे रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान होऊन वेळेची बचत होणार आहे.
डाउन मार्ग- गाडी क्र. १२११७ एलटीटी-मनमाड एक्सप्रेस व १२१३९ मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस मुंबई येथून दुपारी ३ ऐवजी दुपारी २.५५ वाजता. गाडी क्र.१५१०२ मुंबई-छपरा अंत्योदय एक्सप्रेस दुपारी ३.३५ ऐवजी दुपारी ३.३० वाजता सीएसएमटी येथून रवाना होईल.गाडी क्र.२२१२१ एलटीटी-लखनऊ एसी एक्सप्रेस दुपारी२.२० ऐवजी दुपारी १.४० वाजत एलटीटी येथून. गाडी क्र.१२५९८ मुंबई-गोरखपुर अंत्योदय एक्सप्रेस दुपारी २.२० ऐवजी १.३० वाजता सीएसएमटी येथून. २२१०३ एलटीटी-फैजाबाद एक्सप्रेस दुपारी २.३० ऐवजी १.४० वाजता रवाना होईल.
अप गाड्या- गाडी क्र. ११०५४ आजमगढ-एलटीटी एक्सप्रेस दुपारी १२.१५ ऐवजी १२.०५ वाजता एलटीटी पोहचेल.गाडी क्र.२२१४८साईनगर एक्सप्रेस दुपारी३.२० ऐवजी दुपारी ३.१०वा. दादर पोहचेल. गाडी क्र.१२८७० हावडा-मुंबई एक्सप्रेस रात्री११.१५ ऐवजी११.२५ वा. सीएसएमटी पोहचेल. गाडी क्र. १२११२ अमरावती-मुंबई एक्सप्रेस सकाळी ६.२५ ऐवजी ६.४५ वाजत सीएसएमटी पोहचेल.
हा बदल प्रवाशांनी लक्षात घेण्याचे तसेच अधिक माहितीसाठी www. cr. indian rail.gov . in तसेच www. irctc. co .in आणि www. enquiry.indianrail. gov. in/ntes यावर संपर्क करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे असे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी कळविले आहे .
