अंजली दमानिया यांनी खडसेंना अडकविण्याचा केला खुलासा
मुंबर्इ- मी आंदोलनांला जोडल्यानंतर काहींनी माझा संबंध संघाशी जोडला. हे जोडणारे काही सुकाणू समितीचे नेते आहेत. त्यामध्ये राजू शेट्टी हे देखील आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी केला आहे. एकूणच अंजली दमानिया या एकनाथराव खडसे यांना अडकवू पाहत होत्या, असा खळबळजनक आरोपच दमानिया यांच्या एकेकाळच्या सहकारी कल्पना इनामदार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
यामुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे . दरम्यान सोशल मीडियावर याबाबत दिवसभर खडसे समर्थकांची जोरदार चर्चा दिसून आली .
यावेळी बोलताना इनामदार यांनी सांगितले की, खडसे मंत्री झाल्यानंतर अंजली दमानिया यांचे पती अनिश यांनी मेव्हणे आणि दमानिया यांचे भाऊ कृष्णकांत मालप यांना सांगून मला त्यांच्या घरी बोलावले होते. त्यावेळी खडसे आणि अजित पवार यांच्याबाबत दुपारी साडेतीन तास चर्चा झाली. ही चर्चा झाल्यानंतर आपल्याला खडसेंना अडकवायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला पैसे देते, असे मला अंजली दमानिया यांनी सांगितले. काही पत्र मी तुम्हाला देते ती घेऊन तुम्ही खडसे यांच्या ऑफिसला जा आणि त्यावेळी मी दिलेले पैसे खडसे यांच्या टेबलावर ठेवा. त्यानंतर मी मागून लगेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला घेऊन येते, असे मला सांगितले. मालप आणि माझी ओळख असल्याने मी त्यांचे हे काम करेन, असे त्यांना वाटले. पण त्यावेळी मी त्यांना यासाठी स्पष्ट नकार दिला. मी याची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी मला भुजबळांनी धमकी देण्यासाठी पाठवले, असे माझ्यावर खोटे आरोप केले. परंतु भुजबळांशी माझा कोणताही संबंध नाही, असे इनामदार यांनी यावेळी स्पष्ट केले.
अगोदर अडीच वर्षा अगोदर केली आणि आता पुन्हा अण्णांच्या आंदोनात माझी पार्श्वभूमी खराब असून भुजबळांबरोबर संबंध असल्याचा आरोप केला. माझी पार्श्वभूमी खराब आहे असे त्या वारंवार सांगत असतील तर त्याबाबतचे कागदपत्र माध्यमांसमोर सादर करावे अन्यथा माझी माफी मागावी. या संदर्भात दमानिया यांना नोटीस पाठविण्यात आली असून माफी न मागितल्यास त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे इनामदार यांनी सांगितले.
आंदोलनात शेतकरी उभे केले मग मंचावर शेतकरी नेते का नव्हते असा असा प्रश्न केल्यावर माझ्या हातून मार्इक काढून मला धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आले. माझा संघाशी संबंध जोडून माझी बदनामी होर्इल आणि अण्णा मला त्यांच्यापासून दूर कसे करतील असा प्रयत्न सुकाणू समितीमधील काही राजकीय मंडळींनी केला. कोणतेही पुरावे नसताना त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. ज्या ज्या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप करून बदनामी केली त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करण्यात येणार असल्याचे कल्पना इनामदार यांनी यावेळी सांगितले.
सीबीआय चौकशी व्हायला हवी – एकनाथराव खडसे
कल्पना इनामदार यांनी आज मुंबईत अंजली दमानिया यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना अडकविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. यामुळे जळगाव जिल्ह्यातही खळबळ उडाली . यावर बोलताना आ. एकनाथराव खडसे यांनी सीबीआय चौकशी करण्यात येऊन याविषयीचे तथ्य समोर आले पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली .