Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सोनम वांगचूक हे ‘फुंगसूक वांगडू’ नाहीत : आमिर खान
    • धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण
    • ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»उद्धव ठाकरे म्हणतात, ‘मी पॅकेज घोषित करणारा नाही, मदत करणारा मुख्यमंत्री आहे’
    ताज्या बातम्या

    उद्धव ठाकरे म्हणतात, ‘मी पॅकेज घोषित करणारा नाही, मदत करणारा मुख्यमंत्री आहे’

    Tushar BhambareBy Tushar BhambareJuly 30, 2021No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे दोन्ही नेते आज कोल्हापूर जिल्ह्यात होते. दोन्ही नेत्यांनी स्वतंत्रपणे कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केली. या पाहणीनंतर दोघांनीही स्वतंत्र पत्रकार परिषदा घेऊन आपआपली भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे असं म्हटलं. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पॅकेज असो की घोषणा, सामान्य माणसाला पैसे मिळणे, मदत मिळणे आवश्यक आहे, असा टोला लगावला.

    देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन कोल्हापूरसह राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेऊन, काही उपाययोजना सुचवल्या. मात्र त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पॅकेज असो की घोषणा, सामान्य माणसाला पैसे मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री त्याला काहीही म्हणूदेत”

    केंद्राकडे पैसे मागणार नाहीत असं मुख्यमंत्री म्हणतात. पण NDRF च्या नियमानुसार तिकडे नुकसानाची अहवाल पाठवावा लागतो. ही मदत मिळण्याआधी SDRF मधून आपल्याला पैसे खर्च करता येतात. शिवाय NDRF चे निकष मोदी सरकारनेच बदलले. 2015 पर्यंत हे निकष स्थिर होते. इतक्या वर्षात मोदींनीच नियम बदलून, तोकडी मदत दुप्पट केली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

    उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

    मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. मी ह्याच्या आधी देखील सांगितलं आहे की मी सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. मपण सगळ्या पूरग्रस्तांना मदत नक्की करेन, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोल्हापुरात बोलताना केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण

    July 17, 2026

    तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश

    July 17, 2026

    कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif