बोदवड – मेहनतीने,जिद्दीने आणि अभ्यासातील चिकाटीने आपल्या परिस्थितीवर मात करून उंच गगन भरारी घेता येऊ शकते.पण त्यासाठी गरज असते आत्मसम्मान च्या पंखाची.
कृषी उत्पन्न बाजार समिती व आत्मसम्मान फाउंडेशन या सामाजिक संस्थेने ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलांसाठी विनामूल्य सर्व सुविधांनी सुसज्ज अशी अभ्यासिका शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरच्या मजल्यावर सुरू केली आहे.याच अभ्यासिकेच्या माध्यमातून नुकतेच तीन विद्यार्थ्यांनी संघर्ष करून आपले ध्येय गाठले आहे.स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सुनील विश्वनाथ महाले यांनी महसूल विभाग तर मनोज भास्कर हिवराळे,सी. आर.पी.एफ आणि सागर माळी,जे.डी.सी.सी.बँक क्लर्क अश्या पद्धतीने यश संपादन केले आहे.
या तिन्ही गुणवंतांचा सत्कार
आत्मसन्मान फाउंडेशनच्यावतीने सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे शहरात असलेली ही शेतकऱ्यांच्या मुलां- मुली साठी सुरु करण्यात आलेली पहिलीच अभ्यासिका आहे.
स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक त्या पुस्तकांची उपलब्धता,मुलां- मुली साठी बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष, मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन,पिण्यासाठी शुद्ध पाणी अशा विविध सुविधा या अभ्यासिकेत उपलब्ध आहे.
या उपक्रमाचे व त्या माध्यमातून यश संपादन करणा-या या गुणवंतांचे सर्वसामान्यांकडून कौतुक होत आहे.
या आयोजित गुणवंतांचा सत्कार प्रसंगी अध्यक्ष म्हणून या प्रकल्पाचे प्रमुख संदीप बडगुजर,पुरुषोत्तम पाटील, समाधान पाटील,अनिल कळमकर,रंजन राजपूत यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले.
सत्कार मूर्तींना ऐकण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

