मुंबई : राज्याच्या सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला. महाराष्ट्रात उद्याच म्हणजे २७ नोव्हेंबरला बहुमत चाचणी घ्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला. बहुमत चाचणीला १ दिवस बाकी असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्यात खळबळ माजली.
दरम्यान, अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यार असल्याचं बोलंल जात आहे.