पारोळा;- येथील किसान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त रजिस्ट्रार आत्माराम रामचंद्र पाटील (६७) यांनी आजारपणाला कंटाळून हॉटेल ग्रीन पार्क समोरील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ६:३० वाजता घडली.
किसान महाविद्यालयाचे सेवा निवृत्त रजिस्ट्रार व साने गुरुजी कॉलनीतील रहिवाशी आत्माराम रामचंद्र पाटील(६७) हे कंबर आणि गुडघे दुखीच्या आजाराने त्रस्त होते. गेल्यावर्षी एका मोटारसायकलस्वाराने त्यांना धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्यांची शस्रक्रिया झाल्याने त्यांचे फिरणे बंद झाले होते.