तिघांना अटक ; वाहन मालकावरही गुन्हा दाखल
अमळनेर ;- शिरपूर कडून विनापरवाना गुरे घेवून जाणारा ट्रक अमळनेर पोलिसांनी पहाटे चारच्या सुमारास गलवाडे रस्त्यावर टी पॉईंट जवळ अडवला ट्रकमध्ये 20 गुरे कोंबून भरले होते. पोलिसांनी गुरांची सुटका करुन त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तसेच वाहन मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर कडून चोपड्या कडे विनापरवाना गुरे वाहून नेणारा ट्रक जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्याअाधारे पोलिसांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास सापळा रचून पोलिसानी ट्रक थांबवला. पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने नाकाबंदी करून ही कारवाई केली. पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण पारधी, रवी पाटील, मिलिंद बोरसे, योगेश महाजन, भटूसिंग तोमर आदींनी रात्रभर पहारा देत पहाटे ट्रक (एमएच 18–एए 7644) अडवला. शिरपूरहून आयशर गाडीतून 20 बैल नेले जात होते. पोलिसांनी बैलांची सुटका करून पळसदळे रस्त्यावरील श्रीमती भानूबेन बाबूलाल शहा गोशाळेत पाठवले आहेत.
ट्रकचालक रईस मजीद (वय 30, रा महम्मदिया हॉल शिरपूर) शरीफ शाह अमीर शाह (वय-32, रा शिरपूर) आणि अंकुश राजेंद्र पाटील या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. वाहनमालक नथू पितांबर पाटील यांच्यावर देखील प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 (क) (6) (3) (च) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.