यावल (प्रतिनिधी) डोंगर कठोरा येथिल रहीवासी तथा शेतकरी भुमि पुत्र सघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र -सरोदे यांनी आज काही दिवसांपासून जिल्ह्यात अचानक झालेल्या अतिवृष्टी व वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खुप नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा हिसकावला गेला आहे.
आधीच संकटात असलेले शेतकरी यामुळे हवालदिल झाले आहेत.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ याबाबतचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले व देऊन करण्यात आली आहे.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सरोदे,जिल्हा संपर्क प्रमुख नितीन जाधव,दिपक साळवे,भरत बडगुजर हे उपस्थित होते.