मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधात निर्णय घेतला आहे. अजित पवारांवरील कारवाईचा निर्णय पक्षाच्या बैठकीत होईल. सामान्य जनता राष्ट्रवादीसोबत आहे. राज्यात पुन्हा निवडणूक झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची विकासमहाआघाडी एकत्र राहतील आणि त्यांचा पराभव केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं.
महाराष्ट्रात जनमत जे आहे ते भाजपाच्या विरोधात आहे. असं असताना त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला जनता पूर्ण विरोध दर्शवेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. १० ते ११ सदस्य त्यांच्यासोबत गेल्याचं समजतं आहे. जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचं ते करु असंही पवार यांनी सांगितलं. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. असे असलेतरी आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी काय तो निर्णय दिसेल, असे पवार यांनी संकेत दिले.
अजित पवारांनी सह्यांचं पत्र देऊन राज्यपालांची फसवणूक केली. पक्षाच्या धोरणाविरोधात अजित पवार यांनी निर्णय घेतला आहे. सामान्य जनता राष्ट्रवादीसोबत आहे. त्यांनी राजीनामा दिला तर त्यांचा पराभव आम्ही करु, असे शरद पवार म्हणालेत.