अंजली दमानियांच्या सूचनेनुसार आयोग बदलला

0

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा आरोप ; पोलिसांची भूमिका संशयास्पद

जळगाव;- साडेनऊ कोटीचा डीडी व साडे दहा लाख रुपयांचे बनावट धनादेश तयार करून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा कट रचल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह ६ जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल आहे . मात्र याप्रकणात चौकशी आयोग नेमण्यात आला होता . परंतु याप्रकरणात आरोप असलेल्या अंजली दमानिया यांच्या सूचनेनुसार आयोगच बदलला असा गंभीर आरोप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज त्यांच्या जळगावच्या निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केला . याप्रकरणात मोठमोठे मासे अडकतील असा गौप्य्स्फोट करून पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने आपण मुख्यमंत्र्याची भेट घेणार असून या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे खडसे यांनी सांगितले .

काय म्हणाले एकनाथराव खडसे पहा व्हिडीओ

कायद्याच्यानुसार आयोगाची चौकशी सुरु आहे . मात्र आयोगाचे काम योग्यस्वरूपात सुरु असताना आरोप असलेल्या अंजली दमानिया यांच्या सूचनेनुसार आयोग बदलला जातो . मग यापुढे खुनी , किंवा बलात्कार प्रकरणात एखादा आरोपी मी बलात्कारी नाही असे सांगून आयोग बदलण्याचे सांगेल तर याला काय म्हणावे असा सवाल एकनाथरा खडसे यांनी यावेळी उपस्थित केला .
याबाबत बोलताना एकनाथराव खडसे म्हणाले कि, बनावट ,फेक डीडीची तक्रारीची माहिती तत्कालीन पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी दिली होती . फेक असल्याचा तसा लेखी रिपोर्ट सुपेकर यांनी दिला होता . मात्र डीएसपी बदलल्यानंतर पोलिसांकडे गेलो असता मला न्यायालयातून व्हेरिफिकेशन आणावे असे सांगितले . तक्रार दाखल करण्याबाबत सर्व कागदपत्रे जोडून पोलिसांना दिले होते . मात्र एक महिना होऊन गेला तरी गुन्हा दाखल झाला नव्हता . त्यामुळे डीएसपी कराळे यांची पहिल्या दिवसांपासून संशयास्पद भूमिका दिसून आली . यानंतर न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांना एफआयआर दाखल करावा लागला . या प्रकरणात इन्स्पेक्टरने ६ पैकी चार जणांची चौकशी केली . मात्र हे करण्यामागे अंजली दमानिया आणि गजानन मालपुरे यांची नावे चार जणांनी समोर आणली . दरम्यान या प्रकरणात अनेकांनी असे बऱ्याच जणांचे डीडी आणि चेक तयार केल्याचे आरोपींच्या नातेवाईकांनी सांगितले असे खडसे म्हणाले . माझ्या सारख्या व्यक्तीला जर नियमानुसार तीन महिने संघर्ष करावा लागला . इतका भांडूंभांडुन न्याय मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला .

दोन मोठ्या गोष्टी समोर येणार
या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर येणार असून यात मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याचे उघड होणार आहे . पोलिसांनी दबावाखाली एवढे जण आरोपी केले आहेत . त्यामुळे कायदा सुव्यवस्था खुंटीला टांगली गेली आहे . दमानिया यांना डीएसपी पाठीशी घालीत आहे असा आरोपही खडसे यांनी यावेळी केला .

काय आहे प्रकरण

जळगावच्या अॅक्सिस बँकेच्या नावाचा साडेनऊ कोटी रुपयांचा डीडी व चोपडा अर्बन बँकेच्या नावे १० लाखांचा बनावट धनादेश तयार केल्याचा दमानिया , गजानन मालपुरे यांच्यासह सहा जणांवर आरोप आहे. याप्रकरणी खडसेंनी मुक्ताईनगर न्यायालयात तक्रार केली होती. तेथे झालेल्या सुनावणीनंतर २४ तासांच्या आत गुन्हा दाखल करण्याचे आदेशन्यायालयाने दिले होते . या गुन्ह्यात चोपडा अर्बन को. बँकेचे व्यवस्थापक अविनाश भालचंद्र पाटील (वय 45), योगेश काशिनाथ बर्‍हाटे (वय 40) व किशोर लक्ष्मण अत्तरदे (वय 47, तीघे रा.चोपडा) या तिघांना अटक करण्यात आली .

Leave A Reply

Your email address will not be published.