जळगाव – विरल निवृत्ती बऱ्हाटे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विज्ञान आणि तंत्रज्ञान या विद्याशाखेअंतर्गत पीएच.डी.पदवी प्रदान केली आहे. विरल बऱ्हाटे यांनी “नॅनो इलेक्ट्रॉनिक्स” या विषयावर शोधनिबंध डॉ.ए.एम.महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. त्यांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग आधुनिक व प्रगत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये महत्वाचा आहे.
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, प्रा.युवराज वाणी यांनी विरल बऱ्हाटे यांचे अभिनंदन केले आहे.