‘अमित शहा खुनी है’च्या घोषणांनी सभागृहात राडा !

0

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसाद आज अधिवेशनात उमटले. मनसुख हिरेन यांची पोलीस अधिकारी सचिन वाझे (sachin waze) यांनी हत्या केल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकच शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान, ‘अमित शहा खुनी है’ (Amit shah) च्या घोषणा देण्यात आल्याने वातावरण आणखी तापले. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणा मुद्दा उपस्थितीत केला आणि थेट सचिन वाझे यांच्या नावाचा उल्लेख करत अटकेची मागणी केली.

त्यानंतर अनिल परब हे बोलण्यासाठी उभे राहिले ‘ज्यांच्या मृत्यू संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आवाज मिळाला पाहिजे अशी मागणी केली आहे ती योग्य आहे. पण सात वेळा खासदार राहिलेल्या मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावं आहे, त्यांनाही अटक झाली पाहिजे’ अशी मागणी केली.

‘मोहन डेलकर यांची सुसाईड नोट माझ्या हातात आहे, त्यात कोणाचंही नाव नाही. वाझे यांना वाचवण्याकरता डेलकरचे नाव पुढे केलं जात आहे’ असा पलटवार फडणवीस यांनी केला. त्यानंतर सत्ताधारी आणि भाजपच्या आमदारांमध्ये एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूचे सदस्य वेलजवळ आले आणि जोरदार घोषणाबाजी  केली. नाना पटोले म्हणाले की, ‘त्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेली गाडी कशी जाऊ शकते, त्यांना तीन स्तरीय सुरक्षा आहे. महाराष्ट्र एटीएस सगळ्यात चांगलं आहे. मोहन डेलकर विद्यमान खासदार आहेत तरी गुन्हा कसा दाखल होत नाहीये? हे सगळे संशयास्पद आहे.’

 

Leave A Reply

Your email address will not be published.